प्रेम म्हणजे काय
marathi kavita |
"प्रेम म्हणजे काय रे !
"प्रेम म्हणजे काय रे !
दुधावरची साय रे !
आपुलकीची ऊब मिळता
हळूच उतू जाय रे !"
"प्रेम म्हणजे असून नसणं
प्रेम म्हणजे नसून असणं
प्रेम म्हणजे स्वतःपासून
स्वतःलाच हरवून बसणं."
"प्रेम म्हणजे व्याकूळ प्रीत
प्रेम म्हणजे हळवे गीत प्रेम म्हणजे
'कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत'
"प्रेम म्हणजे काय रे ! दुधावरची साय रे !
आपुलकीची ऊब मिळता,हळूच उतू जाय रे !"
"प्रेम म्हणजे असून नसणं,प्रेम म्हणजे नसून असणं
प्रेम म्हणजे स्वतःपासून,स्वतःलाच हरवून बसणं."
"प्रेम म्हणजे व्याकूळ प्रीत,प्रेम म्हणजे हळवे गीत प्रेम म्हणजे
'कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत'
अश्रू ओघळताना
मनाची गाथा सांगतात
हयात नसलेल्या प्रेमाची
चाहूल लावतात
मन दुसरीकडे वळलं की
अश्रुच मनाला अडवतात
आता या हृदयात
नव्याने येणाया दुःखाला
जागा नाही म्हणतात
जुन्या आठवणींकडे वळताना
पुन्हा मन स्थिरावतं
माझी मदत करतात पुन्हा माझेच अश्रू !
अश्रू ओघळताना,मनाची गाथा सांगतात,
हयात नसलेल्या प्रेमाची,चाहूल लावतात,
मन दुसरीकडे वळलं की,अश्रुच मनाला अडवतात,
आता या हृदयात,नव्याने येणाया दुःखाला,
जागा नाही म्हणतात,जुन्या आठवणींकडे वळताना,
पुन्हा मन स्थिरावतं,माझी मदत करतात पुन्हा माझेच अश्रू !
ध्यास
हे पंथिका ,
ठेव तुजबरोबर
स्वप्नांची खैरात
तीच करील तुजवर
सुखाची बरसात
ठेव तुझ्या मनी
नित्य ध्येयाचा ध्यास
सोडू नको कधी
तू सत्याची कास
उरी बाळग तू एकात्मतेचा ध्यास
त्यातूनच निर्मिल
विश्वनिर्मितीचा इतिहास !
हे पंथिका ,ठेव तुजबरोबर,
स्वप्नांची खैरात,तीच करील तुजवर,
सुखाची बरसात,ठेव तुझ्या मनी,
नित्य ध्येयाचा ध्यास,सोडू नको कधी,
तू सत्याची कास,उरी बाळग तू एकात्मतेचा ध्यास,
त्यातूनच निर्मिल,विश्वनिर्मितीचा इतिहास !
marathi kavita prem |
माझी मतप्रणाली
प्रज्वलित केली ज्योत एकात्मतेची
शांततेची, बंधुत्वाची आणि मित्रत्वाची
तमा भेदूनी वाट शोधली उज्वलतेची
श्रीमंतांना पटवून दिली ओळख गरिबीची
धरूनी दाखविली लगट साक्षरतेची
रवानगी केली समाजातून निरक्षरतेची
बरबादी वाचविली होती माणुसकीची
नेकी जोडूनी लाज राखली राष्ट्रत्वाची.
माझी मतप्रणाली
प्रज्वलित केली ज्योत एकात्मतेची, शांततेची, बंधुत्वाची आणि मित्रत्वाची
तमा भेदूनी वाट शोधली उज्वलतेची,श्रीमंतांना पटवून दिली ओळख गरिबीची
धरूनी दाखविली लगट साक्षरतेची, रवानगी केली समाजातून निरक्षरतेची
बरबादी वाचविली होती माणुसकीची,नेकी जोडूनी लाज राखली राष्ट्रत्वाची
मराठी कविता मैत्री |
मन
मन असते क्षितिजासारखे,
शोधून कधी सापडत नाही ।
मन असते आकाशासारखे,
निःशब्द, कधीही बोलत नाही ।
। मन असते नदीसारखे,
अवखळ, कधीही थांबत नाही ।
मन असते वातीसारखे,
मंदपणे जळत राहते ।
मन असते बालकासारखे
हट्टी कधीही ऐकत नाही ।
मन असते कळीसारखे,
हळूवार, जे फूलत जाते ।
मन असते एक भक्ती,
जग जिंकण्याची एक शक्ती ।
मन असते क्षितिजासारखे,शोधून कधी सापडत नाही ।
मन असते आकाशासारखे, निःशब्द, कधीही बोलत नाही ।
। मन असते नदीसारखे,अवखळ, कधीही थांबत नाही ।
मन असते वातीसारखे,मंदपणे जळत राहते ।
मन असते बालकासारखे,हट्टी कधीही ऐकत नाही ।
मन असते कळीसारखे,हळूवार, जे फूलत जाते ।
मन असते एक भक्ती,जग जिंकण्याची एक शक्ती ।
marathi india kavita |
राजकारण
नेता निवडणुकीत मोठी मोठी भाषणे देतो,
हा खातो, तो खातो,
पण सत्तेवर आल्यावर सर्व तोच खातो.
नेता मोठी मोठी आश्वासने देतो,
नी सत्तेवर आल्यावर सर्वसामान्यांनाच विसरतो.
त्यांचे दोष शंभूसारखे कंठात लपवून
त्यांना वाचविण्यासाठी फर्मान सोडतो.
जो नेता सत्तेवर येण्यासाठी मोठी मोठी आंदालने छेडतो,
सत्तेवर आल्यावर तोच नेता जनआंदोलनाविषयी नाराजी व्यक्ती करतो.
जो नेता सत्तेवर येण्यासाठी आतंकवाद घडवतो
सत्तेवर आल्यावर तोच आतंकवादावर भाषणाचे
बाण सोडतो. सत्तेवर असताना जो नेता सर्वांना लुबाडून देशाची व्यवस्था डबघाईला नेतो,
असाच नेता आपल्या देशात निवडून येतो.
राजकारण,
नेता निवडणुकीत मोठी मोठी भाषणे देतो,हा खातो, तो खातो,
पण सत्तेवर आल्यावर सर्व तोच खातो.,नेता मोठी मोठी आश्वासने देतो,
नी सत्तेवर आल्यावर सर्वसामान्यांनाच विसरतो.,त्यांचे दोष शंभूसारखे कंठात लपवून
त्यांना वाचविण्यासाठी फर्मान सोडतो., जो नेता सत्तेवर येण्यासाठी मोठी मोठी आंदालने छेडतो,
सत्तेवर आल्यावर तोच नेता जनआंदोलनाविषयी नाराजी व्यक्ती करतो.,जो नेता सत्तेवर येण्यासाठी आतंकवाद घडवतो,सत्तेवर आल्यावर तोच आतंकवादावर भाषणाचे
बाण सोडतो. सत्तेवर असताना जो नेता सर्वांना लुबाडून देशाची व्यवस्था डबघाईला नेतो,
असाच नेता आपल्या देशात निवडून येतो.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।